yuva MAharashtra जास्त कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

जास्त कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

Admin
By -
0

 


कडेगाव तालुक्यातील काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी मागील ५ ते १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनियमितता तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 प्रशासनाच्या कार्यक्षमतेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करणे गरजेचे आहे.


तरी,५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्या जागी

 नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निवेदन सांगली  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगांव यांनी दिले आणि त्यांचे कडेगांव येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)